शबनम न्युज | प्रतिनिधी
आशिया चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आज ( २ ऑगस्ट ) सामान रंगणार आहे. भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची रंगीत म्हणून आशिया चषक स्पर्धेकडे पाहिलं जात. मात्र, भारत आणि पाकिस्तान हे तणावपूर्व संबंध असलेले शेजारी देश आमने-सामने आल्यावर या लढतीला वेगळंच महत्व प्राप्त झालं आहे.
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. या लढतीत कोहलीने अविस्मरणीय खेळी करताना भरगच्च असलेल्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) भारताला एकहाती विजय मिळवून दिला होता. भारत विरुद्ध पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्याकडं अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेलं आहे.
Advertisement