शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
पुण्यातील विश्रांतवाडी येथे भरधाव टँकरच्या अपघातात जुळ्या मुलींचा टँकर खाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विश्रांतवाडी येथे दुचाकी वर असलेले कुटुंब लाल सिग्नल वर थांबले होते, सिग्नल सुटताच दुचाकीचे एक्सीलेटर वाढले, तेवढ्यात मागून भरधाव येणाऱ्या टँकरने दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात पती-पत्नी, जुळ्या मुली खाली पडले.
दुचाकी तिरकी होऊन सतीश कुमार दुचाकीवरून बाहेर फेकले गेले आणि त्यांची पत्नी व दोन जुळ्या चिमुकल्या टँकर खाली आल्या .टँकर खाली येताच जुळ्या मुलींच्या डोक्यावरून टँकरचे मागील चाक गेले. यामध्ये दोन्ही जुळ्या मुलींचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या पायावरून चाक गेल्याने रक्ताच्या थारोळ्यात त्या पडल्या, बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱ्या त्या टँकर चालकामुळे ही घटना घडली.
यामध्ये आई किरण या थोडक्यात बचावल्या .पण टँकर खाली उजवा पाय येऊन त्यांचा पाय देखील फ्रॅक्चर झाला. मात्र, आई-वडिलांच्या समोर त्यांची दोन्ही जुळे मुली यांचा अंत झाला. टँकर चालकाला त्वरित ताब्यात घेऊन सर्वांनी चोप दिला व विश्रांतवाडी पोलिसांच्या हवाली केले. पत्नी किरण हिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील उपचार सुरू आहे.
बे सावधपणे, बेजबाबदार पणे ,असुरक्षित वाहन चालविणाऱ्या प्रमोद कुमार रामलाल यादव हा उत्तर प्रदेश प्रतापगड जिल्ह्यातील कोपा येथील रहिवाशी आहे. त्याने घाईत, बेसावध , बेजबाबदार व असुरक्षित वाहन चालविल्याने हा अपघात घडला. त्याचा सीसीटीव्ही फुटेज पुढे आला असून, त्याचा बेजबाबदारपणा अधोरेखित झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एस माळी यांनी भा,द,वी, कलम 304 प्रमाणे सदोष मनुष्यवादाचा गुन्हा नोंद केला असून, गुन्हा यांचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे पुढील तपास करीत आहेत.