शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पुणे : : विनोदाची महान देणगी आचार्य अत्रे यांनी दिली आहे. माणूस दुःखाने ग्रासलेला असतो. त्यावर इलाज म्हणून विनोद हेच रामबाण औषध असते, हेच विनोदाचे औषध आचार्य अत्रे यांनी आपल्याला दिले. दुःखावर विनोद हेच रामबाण औषध असल्याचे त्यांनी आपल्या विनोद बुद्धीतून पटवून दिले आहे, असे मत जेष्ठ लेखक प्रा. श्याम भुर्के यांनी व्यक्त केले.
२९ व्या पुणे नवरात्रौ महोत्सव अंतर्गत संवाद पुणे निर्मित विनोद सम्राट प्र. के. अत्रे यांच्या १२५ व्या जन्मशताब्दीनिमित्त नाट्य-चित्रपट गीतांचा कला अविष्कार विनोदवीर अत्रे कार्यक्रम बुधवारी गणेश कला क्रिडा रंगमंच येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ लेखक प्रा. श्याम भुर्के उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते प्रा. भुर्के आणि कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे विश्वस्त घन:श्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढळकर, मुख्य संयोजक अमित बागुल, सागर बागुल यांच्यासह आदी उपस्थितीत होते.
प्रा. भुर्के म्हणाले, हास्य ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती आहे व त्यावरच विनोदाची इमारत उभारली गेली आहे. मराठी विनोदामधील उंच शिखर आचार्य अत्रे आहेत. त्यांनी आपल्या विनोदातून फुंकर घालण्याचे काम केले आहे. सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला विनोदाचा ठसा उमटवला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वामुळे माणसे जोडली गेली.
पुणे नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात आचार्य अत्रे जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम होतो, याचा अभिमान वाटतो. मी लहान असताना अत्रे यांच्या साहित्य संमेलनाला हजर राहता आले, त्यांना ऐकता आले, हे माझे भाग्य आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी आचार्य अत्रे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम सावंत यांनी केले.
यानंतर आचार्य यांची प्रसिद्ध गाणी गायक संजीव मेहेंदळे, संपदा थिटे, मनिषा निश्चल यांनी सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली. अमृता केदार-सिंथेसायजर, दिप्ती कुलकर्णी-हार्मोनिअम, नितीन शिंदे-तबला, अपूर्व द्रविड- रिदम मशीनवर त्यांनी साथ संगत केली.
‘विनोदवीर अत्रे’ कार्यक्रमाची संकल्पना सुनिल महाजन, दिग्दर्शन- निकीता मोघे, संहिता लेखन, निवेदन- रविंद्र खरे यांनी केले.
आचार्य यांची प्रसिद्ध गाणी आज आपुल्या प्रथम प्रीतीचा संगम हा झाला, उगवला चंद्र पुनवेचा, किती पांडूरंगा वाहू, छडी लागे छम… छम, तु सुंदर चाफेकळी, देह देवाचे मंदिर, प्रिय न कवण तुज समान, प्रीती सुरी दुधारी, प्रेम हे वंचिता, भरजरी ग पीतांबर, यमुना जळी खेळ, ललना देवता जगाची, हसरा चंद्रमा, मी ही सुंदर तु ही संदुर एकाहून एक सरस अशी गाणी सादर करुन उत्तरोत्तर कार्यक्रम श्यामची आई, संत गाडगेबाबा, शाहीर अमर शेख, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांची चित्रपतील काही भाग दाखविण्यात आला. अत्रे यांनी हे चित्रपट साकारण्याचे काम केले होते.
आचार्य अत्रे यांनी 22 नाटके लिहिली, यात गंभीर देखील आहेत. आचार्य अत्रे अष्टपैलू कार्यकाळ कार्यक्रमातुन उलगडण्यात आला. श्रोत्यांनी कार्यक्रमाला भरभरून दाद दिली.
अत्रे हे पुण्यात शिकले. आणि विनोदबुद्धी देखील त्यांना येथेच शिकले. ऐकाएका वाक्यात ते विनोद।करीत होते. त्यांच्या लिखाणात साधेपणा आणि सोपी भाषा वापरली आहे, हे या कार्यक्रमातून कलाकारांनी उलगडून दाखवले.