शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
एकता फाउंडेशनच्या वतीने आळंदी येथील स्नेहवन या अनाथ मुलांच्या संस्थेमधील मुलांना दिवाळी फराळ वाटप करत चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी केली.
मराठवाड्यातले कर्जबाजारी होऊन आत्महत्या केलेल्या व गरजवंत मुलं ज्याचे आई वडील हयात नाहीत अशा मुलांना स्नेहवन संस्थेमध्ये शिक्षण आणि निवासी सोय करत असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक देशमाने यांनी सांगितले. संस्थेच्या मुलासोबत आपली दिवाळी साजरी केल्याबद्दल एकता फाउंडेशन चे आभार मानले.
यावेळी एकता फाउंडेशन ट्रस्ट बांदल वस्ती, कुरूळी चे अध्यक्ष वाजिद शेख, उपाध्यक्ष प्रविण निकम, सचिव ज्ञानदेव शिंदे, खजिनदार युवराज भोसले, स्वप्निल मेदनकर, सोपान मोरे, योगेश मोटे, महेंद्रसिगं प्रजापति , श्रीकांत अंबुरे , भरत रसाळ, प्रकाश दाभाडे, अण्णा गाढवे, सतीश टकले, अजय चौरे आदि उपस्थित होते.
Advertisement