शबनम न्युज | पुणे
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय,डुडुळगाव आळंदी. जि. पुणे. या ठिकाणी गुरुवार दिनांक २१ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना रा. से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.संजीव कांबळे यांनी कार्यक्रम घेण्यामागची भूमिका व उद्देश सविस्तर मांडला.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री.राजीव रणदिवे- पोलीस उपनिरीक्षक यांनी विद्यार्थ्यांना वाहने चालवितांना वाहतूक सुरक्षेच्या संदर्भातील नियमांचे पालन करणे कसे महत्त्वाचे आहे या संदर्भात सविस्तर विवेचन करून नियमाचे पालन केल्यामुळे होणारे फायदे आणि नियम न पाळल्यास होणारे तोटे याचा सविस्तर लेखाजोखा पी.पी.टी.च्या माध्यमातून मांडला. सध्या भारतात नियमांचे पालन न केल्यामुळे अपघातामध्ये होणारी संख्या वाढ मोठ्या प्रमाणात असून यावर एकमेव उपाय म्हणजे नियमांचे पालन आणि वेगमर्यादेचे नियोजन होय. आज तरुणाईमध्ये नशा करणाऱ्यांची संख्या जास्तीत जास्त वाढतांना दिसून येत आहे आणि यामुळे तरुण वर्ग हा कसा नशाच्या विळख्यात अडकला जात आहे या संदर्भात विविध उदाहरणांचे दाखले देत मार्गदर्शन केले. तसेच सायबर गुन्हेगारी काय आहे? त्यात आपल्याला कसे अडकवले जाते? या संदर्भात आपण कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे या संदर्भात सविस्तर मत मांडले.
महिला पोलीस नाईक सीमा अंगारे यांनी अपघात होण्याची कारणे कोणती आहेत? त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे या संदर्भातमत व्यक्त करून महाविद्यालयीन तरुणीच्या सुरक्षेच्या संदर्भात ११२ हा नंबर डायल केल्यानंतर तीन ते चार मिनिटात त्या मुलीला कसे तत्पर संरक्षण मिळते या संदर्भात विविध उदाहरणासह मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी वाहतुकीचे नियम पाळणे कसे महत्वपूर्ण असून आपण जेवढे नियमांचे पालन करू तेवढ्या प्रमाणात अपघातांची संख्या घटू शकते या संदर्भात मत व्यक्त करून सर्व विद्यार्थी व सहायक प्राध्यापक यांनी आठवड्यातून एक दिवस सायकलवर महाविद्यालयात येण्याचा उपक्रम राबवला पाहिजे असे मत मांडून सर्व विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा.श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी डॉ. पांडुरंग मिसाळ, प्रा. शाहूराज येवते – प्रमुख विद्यार्थी कल्याण मंडळ, डॉ. छाया जोशी, प्रा. सविता मानके, प्रा. दिपाली ताम्हाणे, प्रा. यशोदा आनेराव, प्रा. सोनाली अभंग, प्रा. प्रेरणा पाटील, प्रा. माधवी चौधरी, श्री प्रवीण भावे -कार्यालयीन प्रमुख,सौ. वर्षा ताजणे, कु. नेहा लांडगे, रामचंद्र पाटील औटी कनिष्ठ महाविद्यालयातील डॉ. सुरेंद्र पवार, प्रा. मीरा केसकर, प्रा. रेखा सुतार, प्रा. सीमा साळुंके, प्रा. प्रियंका वहिले, प्रा. मयुरी वरपे, प्रा.हिमानी पाडळसेकर इत्यादी विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थिनी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कैलास अस्तरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. दिलीप बारी यांनी मानले सदर कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाने झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.माणिक कसाब यांनी दिली.