शबनम न्युज | पिंपरी
सुरक्षितता ही फक्त घोषणा नाही, जीवनाचा एक मार्ग आहे. रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे. रस्ते अपघात ही भारतातील सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेची प्रमुख चिंता आहे आणि राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह हा लोकांना सुरक्षित ड्रायव्हिंगचे महत्त्व आणि रहदारीचे नियम आणि नियमांचे पालन करण्याची गरज याबद्दल शिक्षित करण्याची संधी आहे, असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले.
रस्ते अपघात कमी व्हावे, रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती व्हावी म्हणून केंद्र सरकारने १५ जानेवारी २०२४ ते १४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यानुसार, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवडच्या पुढाकाराने मार्गर्शन अभियान सुरू केले आहे.
राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहदिनानिमित्त आरटीओ इस्पेक्टर विजय महाजन, सुवर्णा किंगरे, कोमल गाडेकर, श्रद्धा मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक रवींद्र कुदळे, खाडे मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक भास्कर खाडे व अक्षय माळवे, एसीआरएसचे संचालक दिपक मोढवे-पाटील, संताजी मुळीक, सुजित निंबाळकर यांनी आभार व्यक्त केले.
सूत्रसंचालन नंदिनी खाडे यांनी केले. यावेळी ECRS चे कर्मचारी व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची…
रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी नवीन कायदे किंवा नियम लागू करणे, रस्ते सुरक्षित करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान किंवा पायाभूत सुविधांची अंमलबजावणी करणे किंवा सीट बेल्ट, हेल्मेट आणि इतर सुरक्षा उपायांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी मोहिमेचा प्रचार यांचा समावेश असतो. रस्ता सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवून आणि त्यात सुधारणा करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमुळे, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह भारतीय रस्त्यांवर सुरक्षिततेची संस्कृती निर्माण करण्यास मदत करतो आणि अपघात आणि मृत्यूची संख्या कमी करण्यास मदत करतो. हे केवळ सामान्य लोकांच्या सुरक्षिततेसाठीच नाही तर देशाच्या आर्थिक विकासासाठीही महत्त्वाचे आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त कले.