शबनम न्यूज, प्रतिनिधी : आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव आळंदी या ठिकाणी विद्यार्थी कल्याण विभाग आणि आय क्यू ए सी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सिक्युरिटी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली सदर कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते विभागाचे प्रमुख प्राध्यापक शाहूराज येवते यांनी सायबर सिक्युरिटी या विषयावर विवेचन करताना सायबर गुन्हेगारी वाढण्याची कारणे कोणती, तसेच त्यावर कोणती उपाययोजना केली पाहिजे, या संदर्भात पीपीटी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ,सध्याच्या काळात मोबाईल, लॅपटॉप इत्यादी इलेक्ट्रॉनिक साधने वापरताना इंटरनेटवर असलेल्या विविध वेबसाईट, ट्विटर ,युट्युब ,फेसबुक वापरताना कोणती काळजी घेणे आवश्यक असून जेणेकरून आपली व कुटुंबाची फसवणूक होणार नाही या संदर्भात फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हंसराज थोरात यांनी सध्याच्या काळात माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट झालेला असून संगणक साक्षरता काळाची गरज बनलेली आहे, त्याचबरोबर मोबाईल, इंटरनेट ,कम्प्युटर याचा दैनंदिन जीवनात उपयोग करताना आपली कोणाकडूनही फसवणूक होणार नाही यासाठी सायबर लॉ चे ज्ञान करून घेऊन आवश्यक ती सावधानता बाळगणे ही प्रत्येकाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे त्या संदर्भात विविध उदाहरणासह मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे आयोजनासाठी डॉक्टर पांडुरंग मिसाळ, प्राध्यापक संजीव कांबळे ,डॉक्टर छाया जोशी ,प्राध्यापक कैलास अस्तरकर, प्राध्यापक परमेश्वर भत्तासे, प्राध्यापिका शैला वाळुंज, प्राध्यापिका सविता मानके, प्राध्यापक दिलीप बारी ,प्राध्यापिका यशोदा आणेवार, प्राध्यापक विकास दिघे ,प्राध्यापिका माधुरी चौधरी ,प्राध्यापिका पूजा खवले ,प्राध्यापक रोहित कांबळे, प्राध्यापिका सुरेखा व्यवहारे , प्राध्यापिका दिपाली सोनवणे ,डॉक्टर समीना मोमीन, प्रवीण भावे, वर्षा ताजने ,श्रीकांत कांबळे इत्यादी विभागप्रमुख सहाय्यक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रेरणा पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापिका सोनाली अभंग यांनी मानले या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्ध प्रमुख प्राध्यापक माणिक कसाब यांनी दिली