शबनम न्यूज , प्रतिनिधी :
औरंगाबाद लोकसभेचे एम.आय.एम पक्षाचे नेते ,खासदार इम्तियाज जलील यांनी आगामी लोकसभा निवडणूक ही उत्तर मुंबईतून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असाउद्दीन ओवेसी यांच्याकडे मुंबईतून लढण्याची इच्छा व्यक्त केली असून येणाऱ्या 18 तारखेला अकोला येथे आपल्या होणाऱ्या पक्षाच्या सभेदरम्यान याबाबतचा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यांनी प्रचार माध्यमांकडे याबाबत प्रश्न विचारले असता सांगितले की बऱ्याच वर्षापासून आमच्यावर लोक बोट दाखवीत होते की आम्ही बी टीम आहोत परंतु आता राजकीय परिस्थिती इतकी बदलली आहे की कोण बी टीम आहे हे सर्वांच्याच लक्षात आले आहे. तसेच राजकीय परिस्थितीत आपण आपल्या पक्षाला वाढविण्यासाठी का प्रयत्न करू नये या विचारातून आपण मुंबईमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
आय एम आय एम पक्ष हा महाराष्ट्रातून आगामी लोकसभा निवडणूक धुळे,मालेगाव, नांदेड औरंगाबाद मुंबई या ठिकाणाहून लढविण्याचा विचार करत आहेत.आणि मुंबईतील मोठे मोठे नेते हे भाजपसोबत गेल्याने आमच्या पक्षा साठी राजकीय परिस्थिती बदलली असल्याने मुंबईतून लोकसभा निवडणुकीत प्रयत्न करणार असे ही खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे
येणाऱ्या 18 तारखेला अकोला मध्ये पक्षाची सभा होत असताना याबाबत निर्णय घेतला जाणार आहे असे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले.