शबनम न्युज | सोलापूर (वृत्तसंस्था)
एक पेपर घ्यायचा. मोठ्या अक्षरात लिहायचं, मी मतदार. पुढार्यांनी माझ्या दारात यायचं नाही, असं लिहून दाराला चिटकवून टाका. उद्यापासून राज्यात ही मोहीम सुरू करा, आपल्या दुचाकी ,चार चाकीला तेच कागद चिपकवायचे. आता मतदान मागायला अमेरिकेत जाणार का? असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आवाहन केले आहे.
पुढे ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा लढा शेवटच्या टप्प्यात आला आहे. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी गोरगरीब मराठा एकत्र आले. 57 लाख नोंदी आतापर्यंत मिळाल्या आहेत, त्याचा आकडा 63 लाख झाला, अशी माहिती आहे. 57 लाखांच्या नोंदीतून आतापर्यंत एक ते सव्वा कोटी जनतेला आरक्षण मिळाले, ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही, त्यांच्यासाठी सगेसोयरे माध्यमातून अधिसूचनेची कायद्यात अंमलबजावणी करायची आणि त्यांना आरक्षण मिळवून द्यायचा आहे, असं त्यांनी म्हटले.
दरम्यान, अधिसूचना मुख्यमंत्र्यांच्या हातातून घेतली. आता सरकारने वेगवेगळे डाव टाकायला सुरुवात केली. मी मध्ये बोललो ते खूप लागले. मी काही वाईट बोललो नाही. कोट्यवधी मराठी सहा महिने लढतायेत. त्यांच्यावरील अन्याय सहन करू शकत नाही. त्यामुळे तळपायाची आग मस्तकात गेली. मित्रत्व तुमच्याशी करण्यासाठी आंदोलन उभे केले नाही, तर जातीसाठी उभे केले आहे. माझ्या अंतरवालीतील आई, बहिणींची डोकी फुटली तेव्हा तुम्हाला का वाईट वाटलं नाही. नेत्याला बोललो म्हणून तुटून पडले, असा टोला जरांगेंनी टीका करणाऱ्या मराठ्यांवर केली आहे.