शबनम न्यूज / पिंपरी
महात्मा फुले नगर मध्ये धोकादायक असलेल्या झाडांच्या फांद्यांची महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे छाटणी करण्यात आली. त्यामुळे आता नागरीकांची तक्रार दूर झाली आहे.
सध्या पावसाळ्याच्या दृष्टीने घराजवळील असणाऱ्या धोकादायक फांद्या मुळेच दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच उद्यान विभागाकडून अशा झाडांची छाटणी करण्यात येत असते. महात्मा फुले नगर मध्ये देखील झाडांच्या फांद्या मोठा प्रमाणात वाढली असल्यामुळे तेथील पत्रा शेड सारख्या घरांना धोका होण्याची शक्यता होती. नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी महापालिकेच्या अधिका-यांना सांगून धोकादायक फांद्यांची छाटणी केली आहे.
Advertisement