शबनम न्यूज , प्रतिनिधी :
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, शरदचंद्र कला आणि वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव, आळंदी, जि. पुणे या ठिकाणी कविश्रेष्ठ, विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी गौरवदिनानिमित्त ‘मराठी असे आमुची मायबोली’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा.संजीव कांबळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश व भूमिका स्पष्ट केली.
या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी मराठी भाषेचा इतिहास रेखाटतांना मराठीतील साहित्य कसे दर्जेदार आहे आणि त्या साहित्याचा आधुनिक पिढीला कसा फायदा होतो या बाबत सखोल मार्गदर्शन केले.वि.वा. शिरवाडकर यांनी लिहिलेल्या ‘ नटसम्राट ‘ या नाट्य लिखाणाला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराचे महत्त्व अधोरेखित करून त्यातील व्यक्तिरेखा आणि त्यांचे जिवंत संवाद आजही प्रत्येक व्यक्तीच्या मनात कसे घर करते या संदर्भात सविस्तर घेतला मागोवा घेतला. तसेच संस्कृत- अपभ्रंश – प्राकृत – मराठी प्रवास, पंडित, शाहीर,संत तसेच आधुनिक साहित्यिक यांचे योगदान स्पष्ट केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी महाराष्ट्र सरकारने मराठी भाषा विद्यापीठ महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांच्या जन्मभूमी व कर्मभूमी वृद्धीपुर या ठिकाणी स्थापन केलेले आहे. त्याद्वारे मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त करण्याच्या चळवळीला मोठे पाठबळ मिळाले आहे. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी मराठी भाषेचे योगदान निश्चितच महत्वपूर्ण ठरणार आहे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी मा. मयूर मुरलीधर ढमाले खजिनदार- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाला डॉ. छाया जोशी,प्रा. कैलास अस्तरकर, प्रा. परमेश्वर भत्ताशे प्रा.शाहूराज येवते, प्रा.विकास दिघे, प्रा.यशोदा आनेराव, प्रा.प्रेरणा पाटील, प्रा.सोनाली अभंग, प्रा. माधुरी चौधरी, प्रा. पूजा खवले, प्रा. पूजा मिटकरी, प्रा. सुरेखा व्यवहारे, श्री. प्रवीण भावे, सौ. वर्षा ताजणे, श्री. वैभव बडवे,श्री.श्रीकांत कांबळे इत्यादी विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सविता मानके यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. दिपाली ताम्हाणे यांनी मानले.
या कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाने झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.माणिक कसाब यांनी दिली.