शबनम न्युज | मुंबई
भाजपचे सरकार हा देशाला लागलेल्या कलंक आहे. हा कलंक निवडणुकीतून धुवून काढावा लागेल, निवडणूक रोख्याच्या घोटाळ्यामुळे भाजपा 400 पार नाहीतर तडीपार होणार आहे, अशी घनाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 या कालावधीत निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून प्रादेशिक पक्षांना 5221 कोटी रुपयांच्या देण्याच्या मिळाल्या आहेत. याच कालावधीत भाजपला मिळालेल्या 60 60.51 कोटी रुपयांच्या देणग्यांच्या तुलनेत प्रादेशिक पक्षांना मिळालेले रक्कम 839 कोटी रुपयांनी कमी आहे. निवडणूक आयोगाचे संकेतस्थळावरील माहिती नंतर विरोधकांनी भाजपावर जोरदार निशा साधला आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही भाजपावर घनाघाती टीका केली आहे.
दरम्यान, औषध कंपन्या रुग्णालयात शेकडो कोटी भाजपाला दिले आहे. गेमिंग कंपन्या जुगार ऑनलाईन लॉटरी कंपन्यांनी हजारो कोटी भाजपाला दिले. प्राप्ती कर विभागाची कारवाई सुरू आहे. त्यांनी भाजपाला पैसे दिले. या प्रकरणी मनी लॉंडरिंगची केस भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर चालवली पाहिजे आणि त्यांना अटक केली पाहिजे. भाजपकडून हजारो कोटींची लूटमार करून विरोधी पक्षाला नीतिमत्ता शिकवण्याचा उद्योग केला जातो, असा मोठा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.
देशात हुकूमशाही सुरू झाली आहे. ज्या पद्धतीने निवडणूक रोख्यांचा घोटाळा समोर आला आहे, त्यातून “सिर्फ मै खाऊंगा…” हा मोदींचा नवा संदेश गावागावात गेला आहे. ‘ना खाऊंगा और न खाने दुँगा’, असे मोदी एकेकाळी म्हणाले होते. पण आता ‘मैं और मेरे लोग खायेंगे’ हा नवा संदेश आता सामान्य माणसापर्यंत पोहोचला आहे, असे संजय राऊत म्हणाले.