शबनम न्युज | मुंबई
निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली मराठ्यांना न्याय दिला नाही तर मग यांना आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. मराठा समाजाच्या नाराजीची लाट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना अंगावर घ्यायची नसेल तर त्यांना सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागेल. अन्यायकारक निर्णय लादून चालणार नाही. तसेच मी महाराष्ट्राच्या समाजाला हे सांगतो आहे की आचारसंहितेच्या नावाखाली मराठ्यांचे प्रश्न दाबले जात आहेत, असा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे.
ते म्हणाले, आता मराठ्यांना हा निर्णय घ्यावाच लागेल. हजारो पोरांवर गुन्हे दाखल झाले आहेत, माता माऊली रस्त्यावर आहेत. पूर्वीच्या राजाला दया यायची या राजाला दया येत नाही. मी महाराष्ट्राच्या समाजाला हे सांगतो आहे की आचारसंहितेच्या नावाखाली मराठ्यांचे प्रश्न दाबले जात आहेत, असा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे.
सात महिन्यांपासून मराठे रस्त्यावर आहे. त्यांची चेष्टा करु नका अन्यथा समाजाला नाईलाजाने निर्णय बदलावा लागेल. मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी बाकी आहे. निवडणूक पुढे ढकलली जाईल असं वाटतं आहे. आमच्या बाजूने निर्णय झाला नाही तर आम्हालाही निर्णय घ्यावा लागेल असा इशाराच मनोज जरांगेंनी दिला आहे.