शबनम न्युज | मुंबई
मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून, आचारसंहिता लागण्यापूर्वी सगे -सोयरे अध्यादेशचा काढतील, अशी आशा होती. मात्र सरकारने तसे न केल्यास सरकारच्या डावाला प्रति डावाने उत्तर देऊ, असे मत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी सगे-सोयऱ्यांच्या आरक्षणासाठी चार महिने लागणार असल्याची माहिती देत मनोज जरांगे पाटील यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
जरांगेंच्या मागण्यांवर विचार करत असून, सरकारचे सगे-सोयऱ्यांचे नोटिफिकेशन काढले होते. सरकारच्या या नोटिफिकेशन वर 8 लाख 47 हजार हरकती आल्या आहे. या हरकतींचा अभ्यास केला जात असून, या प्रक्रियेला चार महिने लागतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी स्पष्ट केले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी वडवणी येथील भाषणातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांवर हल्लाबोल करत भाजपाचा 48 पैकी काही जागा निवडून येणार नाही, असा इशारा दिला आहे.
निवडणूक आणि आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वी राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठक घेत मोठे निर्णय घेतले आहेत. आज झालेल्या बैठकीत राज्य सरकारने १७ मोठे निर्णय घेतले आहेत. ‘राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर, ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाला ५० कोटी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळासाठी ५० कोटी भागभांडलीचीही घोषणा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली आहे.