शबनम न्युज | मुंबई
कोरोना काळात वॅक्सिंग बनवणाऱ्या कंपन्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोडो रुपये हप्ताच्या स्वरूपात घेतले, असा घनाघाती आरोप राहुल गांधी यांनी ठाण्यातल्या चिंतामणी चौकातील सभेत करत या हप्त्यातून मिळालेल्या पैशातूनच राज्य सरकार पाडत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष फोडून सत्ता स्थापन केली , असा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही शनिवारी ठाण्यात आली होते. यावेळी जांभळी नाका येथे झालेल्या सभेत गाडीवरून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, भाजप आणि आरएसएस हे व्यक्ती-व्यक्तीमध्ये द्वेष पसवरण्याचे काम करत आहे. मी एक वर्षापूर्वी भारत जोडो यात्रा केली होती. ही देशाला जोडणारी यात्रा होती. मात्र, भाजपा आणि आरएसएसचे लोक देशातील नागरिकांमध्ये एकमेकांशी भांडण नावाचे काम करत आहे, हे दोघे मिळून 24 तास देशाला कमजोर करत आहेत, असा आरोप देखील भाषणातून राहुल गांधी यांनी केला आहे.