शबनम न्युज | मुंबई
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत. त्यांच्याशी अनेक चर्चा झाली. आम्ही त्यांना चार जागांवर लढावे, हा प्रस्ताव दिला. परंतु त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसते. तो प्रस्ताव मान्य केला असता तर नक्की आम्हाला आनंद झाला असता, असे म्हणत ठाकरे गटाची खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडी सोबतच्या युतीवर भाष्य केले आहे.
ते म्हणाले, हुकूमशाही विरोधातील लढयाला संविधान वाचवण्याच्या लढाईला बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या सोबत असल्याने गती आणि बळ मिळाले असते, पण आम्हाला अजूनही खात्री आहे. सगळे प्रमुख नेते एकत्रित बसतील आणि ते पुन्हा बाळासाहेब आंबेडकर यांची चर्चा करतील, त्यांच्या मनात जर काही नाराजी अस्वस्थता असेल तर ती दूर करण्यात आम्हाला यश येईल, या लढाईत महाराष्ट्रातील दलित, शोषित समाज आमच्या सोबत असायलाच पाहिजे, ही आमची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.