शबनम न्युज | पिंपरी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव, (आळंदी), जि. पुणे. या ठिकाणी प्राचार्य डॉ.हंसराज थोरात यांची सेवापूर्ती व प्राचार्य डॉ. विजय ढोले यांचा सेवारंभाच्या निमित्त सेवापूर्ती व सेवारंभ सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन,प्रतिमापूजन व प्रा. प्रेरणा पाटील यांच्या गणेशवंदना स्वागत गीताने झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ.पांडुरंग मिसाळ यांनी प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांच्या कार्यकर्तृत्वाचे विवेचन करून कार्यक्रमाची भूमिका व उद्देश सविस्तर स्पष्ट केला. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. डॉ. छाया जोशी यांनी करून दिला.
या वेळी प्रा. शाहूराज येवते, प्रा. कैलास अस्तरकर, प्रा. संजीव कांबळे,प्रा. डॉ सुरेंद्र पवार, प्रा. शैला वाळुंज व श्री. प्रवीण भावे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.प्रा.डॉ.किशोर निकम – उपप्राचार्य डॉ.डी.वाय. पाटील कॉलेज, पिंपरी यांनी डॉ हंसराज थोरात सर यांच्या संदर्भात मत मांडतांना सरांची प्राचार्य म्हणून नियुक्ती करतांना विद्यापीठ कमिटीवर प्रमुख म्हणून मीच होतो आणि सेवापुर्तीच्या कार्यक्रमाला सुद्धा शिष्य म्हणून मीच उपस्थित आहे याचे कारण म्हणजे गुरु आणि शिष्यांचे अतूट प्रेम संबंध होय असे मत मांडून सज्जनता, व्यवहार सुलभता, नैतिकता व प्रामाणिकपणा, प्रशासकीय सजगता हे गुण सरांमध्ये निसर्गतः अस्तित्वात आहेत. या संदर्भात मत मांडून महाभारतातील कर्ण आणि परशुराम यांच्यातील गुरु शिष्याची महती वर्णन केली. प्राचार्य हे पद महाविद्यालयातील काटेरी मुकुट असून मॅनेजमेंट आणि शिक्षक यांच्यातील दुवा म्हणून कशी भूमिका पार पाडावी लागते, तसेच मॅनेजमेंटची भूमिका आणि शिक्षकांच्या इच्छा आकांक्षा यांची यांची बांधणी करणे कशी तारेवरची कसरत आहे. तसेच प्राचार्य म्हणून निर्णय घेतांना, निर्णय क्षमता कशी प्रबळ असली पाहिजे या संदर्भात सर्व भूमिका सरांनी कशात तत्परतेने पार पाडल्या तसेच सरांचे शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय योगदान कसे मोलाचे आहे या संदर्भात मत व्यक्त करून सरांना पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी मनोगत व्यक्त करतांना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जीवनात स्वीकारण्याची आवश्यकता व्यक्त करून लहानपणापासून लागलेल्या चांगल्या सवयी काही वेळा तोटा निर्माण करतात तरीसुद्धा जीवन व्यतीत करतांना राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती, शुद्ध चारित्र्य, चांगल्या सवयी व्यक्तीला आयुष्यात यश संपादन करण्यासाठी मदत करतात. कोणतेही काम करतांना भावनिक कमजोरी नसली पाहिजे. ज्या ठिकाणी व्यक्तीचा अहंकार संपतो त्या ठिकाणापासून व्यक्तीचे खरे आयुष्य चालू होते असे मत व्यक्त करीत कोणतेही काम प्रामाणिकपणे केले तर डाग लागत नाही. संस्थेने दिलेला ‘आचार्य श्री पुरस्कार’ म्हणजे आई-वडिलांनी दिलेली शबासकी होय असे पुरस्कारांच्या संदर्भात मत व्यक्त करून शरीराने जरी मी सेवानिवृत्त होत असलो तरी मनाने नेहमी तुमच्यासोबत असेल असे मत व्यक्त करून शिक्षण संस्थेतील सर्व पदाधिकारी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कार्याचा गुणगौरव करून सर्वांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. मयूर मुरलीधर ढमाले, खजिनदार- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, मा.प्रा. राजीव पाटील, प्रशासकीय संचालक- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, डॉ. प्रमोद इंगळे, प्राचार्य – ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, सौ. शितल पाटील, प्राचार्या -आदित्य इंटरनॅशनल स्कूल, श्री.अतुल पानसरे मुख्याध्यापक- राजा शिवछत्रपती विद्यालय यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी प्रा. परमेश्वर भत्ताशे, प्रा. सर्जेराव बरकडे, प्रा. सचिन सोनार, प्रा. पायल कर्पे, प्रा. मीना शिंदे,प्रा.रोहित कांबळे, प्रा.महेश म्हसागर,श्री.प्रवीण भावे, प्रा.रेखा सुतार,प्रा.मीरा केसकर,प्रा.सविता मानके प्रा.यशोदा आनेराव, प्रा.प्रेरणा पाटील, प्रा.सोनाली अभंग, प्रा.माधुरी चौधरी,प्रा.पूजा खवले, प्रा.पूजा मिटकरी, प्रा.सुरेखा व्यवहारे, प्रा. प्रियंका वहिले,प्रा.कीर्ती राऊत, प्रा. प्रदीप तळेकर, प्रा. रत्नेश नारखेडे, प्रा. सुरेश चौधरी,सौ. वर्षा ताजणे, श्री युवराज हातागळे,श्री. वैभव बडवे,श्री. श्रीकांत कांबळे, श्री. विनोद मोगल इत्यादी विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दिलीप बारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. सीमा साळुंखे यांनी मानले. या कार्यक्रमाचे सांगता सामूहिक पसायदानाने झाले अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.माणिक कसाब यांनी दिली.