शबनम न्युज | दिल्ली (वृत्तसंस्था)
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर अर्थातच INDIA आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यात मॅरेथॉन सभा घेत आहेत. आज त्यांनी बिहारच्या नवादा येथे जाहीर सभेत INDIA आघाडीवर हल्लाबोल केला आहे. “रामनवमी येत आहे, पाप करणाऱ्यांना विसरू नका,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
ते म्हणाले, “रामनवमी येत आहे. पाप करणार्यांना विसरू नका. त्यांनाही माहिती की मोदींच्या गॅरंटी मुळे त्यांचे दुकान बंद होत आहे. म्हणूनच हे लोक मोदींच्या गॅरंटीला विरोध करत आहेत. इंडिया आघाडीकडे ना दूरदृष्टी आहे ना विश्वासाहत आहे. ते दिल्लीत एकत्र येतात आणि आपापल्या राज्यात एकमेकांना शिव्या देतात. ते बळजबरीने एकत्र आले आहेत. INDIA आघाडी म्हणजे देशद्रोही शक्तीचे घर आहे. या आघाडीचे लोक भारताचे विभाजन करण्याची भाषा बोलतात. काँग्रेस आणि आरजेडीला एकही मत मिळण्याचा अधिकार नाही. या लोकांना सत्तेचे व्यसन लागले आहे. सत्तेतून बाहेर पडताच पाण्यातल्या माशाप्रमाणे तडफड करतात,” अशी घनाघाटी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.
तसेच या बोलताना पुढे ते म्हणाले, “ते म्हणतात की मोदींनी गॅरंटी देणे योग्य नाही. त्यावर बंदी घातली पाहिजे. मोदींनी दिलेली गॅरंटी बेकायदेशीर असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. मी गॅरंटी देतो कारण माझी नियत साफ आहे. मी गॅरंटी देतो कारण माझ्या ती पूर्ण करण्याची ताकद आहे,” असेही मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.