शबनम न्युज | मुंबई
महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने स्पेशल अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यासह कोकण पश्चिम आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शनिवार पर्यंत हिट व्हेव कायम असेल. सतत तीन दिवसापासून रायगड, ठाणे जिल्ह्याच्या तापमानात वाढ आहे. दरम्यानच्या काळात काही भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहू शकतात आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असे देखील हवामान विभागाने म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्यसह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा ,ओडिषा, पश्चिम बंगाल आणि झारखंड मध्ये उष्णतेची लाट आली असून, या सर्व राज्यांचे सरासरी तापमान 41 अंशावर गेले आहे, रायगड जिल्ह्यातील कर्जतचे तापमान ४४.४ अंश सेल्सिअस वर गेल्याने सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे.
तसेच हवामान विभागाने ठाणे आणि मुंबईमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, नगर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातही उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे.