शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
अभिनेत्री कंगना राणावत हिने ‘१९४७ ला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हती तर ती भीक होती. खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले असे वक्तव्य केले.’ या तिच्या वक्तव्याचा सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी निषेध करीत पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना निवेदन देत मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत हिने ‘१९४७ ला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हती तर ती भीक होती. खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले असे times now या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना जाहीर वक्तव्य केले आहे.’ ते सर्व प्रसिद्धी माध्यमातून दाखवण्यात येत आहे. या तिच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत.
खरेतर भारत मातेच्या पारतंत्र्याच्या शृंखला तोडण्यासाठी १८५७ ते १९४७ या प्रदीर्घ काळात लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या घरादाराची राखरांगोळी करून प्रसंगी प्राणाची आहुती स्वातंत्र्य संग्रामाच्या यज्ञकुंडात हसत हसत दिली. यामध्ये अनेकांनी ब्रिटिशांच्या छातीवर गोळ्या घेत प्राणाची आहुती दिली. तर काही क्रांतिकारक हसत हसत फासावर गेले व आपल्या प्राणाची आहुती दिली. यामध्ये शहीद भगतसिंग, राजगुरू,सुखदेव,चंद्रशेखर आजाद,उधमसिंग अशा अनेक लाखो क्रांतिकारकांचा सहभाग होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, पंडित नेहरू, मौलाना अबुल कलाम, सरहद्द गांधी,अशा लाखो विद्वान धुरणींनी आपल्या संसाराची तमा न बाळगता उभे आयुष्य स्वातंत्र्यांची चळवळीत खर्ची घालवुन हा देश स्वातंत्र्य केला.
प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत हिने वरील जाहीर वक्तव्य करून या सर्व स्वातंत्र सैनिक, क्रांतिकारकांचा घोर अपमान करून खूप मोठा गुन्हा केला असून. तिच्या या वक्तव्यामुळे आमच्या भावना तीव्र दुखावल्या असुन समाज्या अशांतता माजेल असे हे निषेधार्य वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे तिच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ५०४,५०५ व १२४ ए या कलमाखाली तातडीने गुन्हा नोंदवून तिला अटक करण्यात यावी. असे हि सदर निवेदनात नमूद केले आहे.