शबनम न्यूज | मुंबई (दि.११ डिसेंबर) :- ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील ट्विट करत म्हणाले, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण केवळ महाराष्ट्रातच रद्द झाले, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे खापर केंद्र सरकारवर फोडता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेली पाऊले उचलण्यात टाळाटाळ करून मविआ सरकारने अध्यादेश काढला, म्हणूनच न्यायालयाने हा अध्यादेश रद्द केला. असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण केवळ महाराष्ट्रातच रद्द झाले, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे खापर केंद्र सरकारवर फोडता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेली पाऊले उचलण्यात टाळाटाळ करून मविआ सरकारने अध्यादेश काढला, म्हणूनच न्यायालयाने हा अध्यादेश रद्द केला. pic.twitter.com/klS4pm02oC
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 11, 2021
Advertisement