फडणवीस यांना चिंचवड केएसबी चौकात कॉंग्रेसने दाखविले काळे झेंडे
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०७ मार्च) :- कामगार नेते स्व. आमदार आण्णासाहेब पाटील यांच्या विषयी सर्व कामगारांना व माझ्यासारख्या कामगार नेत्यांना आदर आहे. आण्णासाहेब पाटलांनी माथाडी कामगार कायदा व्हावा यासाठी आपले जीवन समर्पित केले. कॉंग्रेस पक्षाने प्रथम महाराष्ट्रात माथाडी कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ‘माथाडी कामगार कायदा’ करुन त्यांना सन्मान दिला. परंतू ज्या भाजपाने कामगारांचे न्याय हक्क डावलून चार सुधारीत कामगार कायदे केले. त्यामुळे कामगारांच्या पुढच्या पिढ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. त्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते चिंचवड मध्ये आण्णासाहेब पाटील यांच्या स्मारकाचे उद्घाटन झाले आहे. याचा पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेस आणि कामगार बंधू भगिनी तीव्र निषेध करीत आहेत अशी प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिली.
कामगार नेते स्व. आमदार आण्णासाहेब पाटील यांच्या स्मारकाचे चिंचवड केएसबी चौक येथे रविवारी (दि. ६ मार्च) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी व कामगारांनी काळे झेंडे दाखवून निदर्शने करीत ‘फडणवीस गो बॅक’ अशा घोषणा देऊन भाजपाचा निषेध केला. यावेळी महिला शहराध्यक्षा सायली नढे, कॉंग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेन्द्र गायकवाड, पिंपरी विधानसभा अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, अॅड. उमेश खंदारे, माजी नगरसेवक विश्वनाथ गजरमल, दिलीप पांढारकर, युवक उपाध्यक्ष सौरभ शिंदे, अर्जुन लांडगे, प्रा. किरण खाजेकर, ॲड. के. एम. रॉय, इस्माईल संगम, दिनकर भालेकर, अनिता अधिकारी, छायाताई देसले, डॉ. मनिषा गरुड, किरण नढे, आबा खराडे, हरिश डोळस, डॉ. सुनिता पुलावळे, निर्मला खैरे, विजय ओव्हाळ, बाबा बनसोडे, सतिश भोसले, जितेंद्र छाब्रा, संदिप शिंदे, सुप्रिया मलशेट्टी, प्रिया कदम, एकनाथ मुंडे, रवि नांगरे, उमेश बनसोडे, रवि कांबळे, सुधाकर कुंभार, सुभाष भंडारे, अमित जगदाळे, शरद कांबळे, सुरज गायकवाड, शिल्पा गायकवाड, राहुल ओव्हाळ, पांडुरंग जगताप, विशाल सरवदे, सुप्रिया पोहरे, आकाश शिंदे, विठ्ठल शिंदे, शरद पुलावळे, सॅम पिल्ले आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. कैलास कदम यांनी आमदार नरेंद्र पाटील यांना आवाहन केले की, देशातील कामगारांना कॉंग्रेस पक्षच न्याय आणि सन्मान देऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा या अलिबाबा आणि चाळीस चोरांनी देश विकायला काढला आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील यांनी आपल्या सर्व माथाडी कामगारांसह कॉंग्रेसची साथ द्यावी. तसेच देशाच्या जीडीपीमध्ये कामगारांचे योगदान महत्वपुर्ण आहे. दरवर्षी देशात दोन कोटी रोजगार निर्माण करु असे सांगून केंद्रात सत्तेवर आलेल्या पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारने कामगारांविरोधी कायदे केले. त्यामुळे कोट्यावधी कामगार बेरोजगार झाले. त्यामुळे पुढील पिढीचे आर्थिक, सामाजिक आणि कौटूंबिक स्थैर्य नष्ट होणार आहे. माथाडी नेते स्व. आण्णासाहेब पाटील यांनी कामगारांच्या हक्कासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या स्मारकाचे उद्घाटन फसवेगिरी करणा-या भाजपा नेत्यांच्या हस्ते होणे हा कामगारांचा अपमान आहे. त्याचा पिंपरी चिंचवड कामगार नगरीत कॉंग्रेस आणि कामगार संघटना तीव्र निषेध करीत आहेत असे डॉ. कैलास कदम म्हणाले.