शबनम न्युज | पिंपरी
देहूतल्या शिळा मंदिर लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते झाला. कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. यावरुन पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष कविता अल्हाट यांनी केंद्र सरकारवर टीका केली ते म्हणाल्या की, मोदी सरकारने केवळ अजितदादांचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या देखील अपमान केला.
देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. भारतीय जनता पार्टीने आपल्या पक्षाचे नाव अवमान पार्टी ठेवावे, २०१४ मध्ये देखील पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना मुंबई येथे एका कार्यक्रमांमध्ये त्याच्या देखील अवमान केला होता, यामुळे भारतीय जनता पार्टीने आपल्या पक्षाचे नाव अवमान पार्टी ठेवावे, अशी टीका पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष कविता अल्हाट यांनी केली.
राजशिष्टाचार म्हणून अजित दादा पवार उपस्थित
या कार्यक्रमाला राजशिष्टाचाराचा भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. पंतप्रधानांच्या स्वागतापासून या कार्यक्रमाच्या समारोपापर्यंत अजित पवार उपस्थित होते.