शबनम न्युज | पिंपरी
शहरातील व प्रभागातील अर्धवट स्थितीतील रस्ते आणि विकासकामे त्वरित पूर्ण करा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहराचे मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनाद्वारे केले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, शहरातील अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यासाठी खोदकाम करून ठेवले आहे. त्यामुळे रस्त्यावरच भले मोठे खड्डे पडलेत. नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळा असल्यामुळे रत्यावर राडारोडा पडून वाहने घसरून अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्धवट स्थितीतील विकासकामे मार्गी लावून नागरिकांना दिलासा द्यावा, असेही सदर निवेदनात सचिन चिखले यांनी नमूद केले आहे.
Advertisement