शबनम न्युज | मुंबई
आज महाराष्ट्रात काय सुरु आहे? एकीकडे तुम्ही आणि दुसरीकडे बाळासाहेबांचा शिवसैनिक छातीचा कोट उभा करुन उभा आहे. कोण कोणाला घायाळ कऱणार, धारातीर्थी पाडणार याचा विचार करा. एकदा लढा पुकारल्यानंतर थांबायचं कुठे कळतं तो खरा यौद्धा, नेता असतो. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारत, रामायणाची पुनरावृत्ती होणार आहे, शिवसेना नेते भास्कर जाधव म्हणाले आहे. आज विधानसभेच्या दुसऱ्या दिवशीच्या अधिवेशनात ते बोलत होते.
ते म्हणाले कि, भास्कर जाधव यांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे हे आज मला समजलं. जी भावना त्यांनी आज व्यक्ती केली ती दीड वर्षांपूर्वी व्यक्त केली असती तर बरं वाटलं असतं. असा टोला प्रताप सरनाईक यांनी लगावला. भास्कर जाधव यांच्या भाषणादरम्यान सत्ताधारी नेत्यांचा गोंधळ सुरु झाला होता.
यावेळी मराठी माणसांवर ईडी चौकशी लावण्यात आली, असा आरोप भास्कर यांनी केला. ते म्हणाले, अविनाश भोसले, संजय राऊत, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव या सर्व मराठी माणसांवर ईडी चौकशी लावण्यात आली असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. भास्कर जाधव यांनी यावेळी प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, प्रसाद लाड, प्रशांत परिचारक, कपिल पाटील, विजय गावित, सम्राट महाडिक, माणिकराव गावित, सुर्यकांता पाटील अशी अनेक नावं घेतली असता अध्यक्षांनी त्यांना रोखलं.