शबनम न्युज | मुंबई
भाकरी एकाची आणि चाकरी दुसऱ्याची, ही संजय राऊतांची आजची अवस्था आहे, असा टोला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
सामनाच्या अग्रलेखांमध्ये आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर ईडी चौकशीवरून भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. सोमवारी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना ईडीने त्यांच्या कार्यालयात बोलावले होते आणि सीबीआयच्या भीतीने शिवसेनेचे 40 आमदार पळून गेल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. त्यांच्यापैकी काहींना तपासासाठी समन्स आले होते त्यांनी बाजू बदलताच भाजप नेत्यांना ईडी कडून संरक्षण दिले, पण छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत हे नेते ईडीच्या कारवाईला बळी पडले नाहीत. जयंत पाटील यांनी भाजपची गुलामी स्वीकारण्यास नकार दिला आहे, त्यानंतर ईडीने त्यांना तातडीने समन्स बजावले असल्याचा आरोप अग्रलेखात करण्यात आला आहे, त्यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांचे आरोप फेटाऊन लावले आहेत, तसेच त्यांच्यावर टीका केली आहे.
ते म्हणाले, हा त्यांचा फॉर्म्युला आहे, सामना फेकन्युज फॅक्टरी झाली आहे, जयंत पाटील यांना प्रस्ताव देण्याचा भाजपचा प्रश्नच येत नाही. जयंत पाटील यांना ऑफर देण्याचा आरोप उपाध्ये यांनी चुकीचे असल्याचे सांगितले आहे.