शबनम न्युज | मुंबई
भाजपाकडून जयंत पाटील यांच्यावर दबाव होता, त्यांनी भाजपाचा प्रस्ताव मान्य केला नाही म्हणून त्यांच्यावर ईडी कारवाई झाली, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला, तर राऊतांच्या हा दावा भाजपाने फेटाळला, पण दोन वर्षांपूर्वी मलाही भाजपाने प्रस्ताव पाठवला होता, असे विधान माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.
ते म्हणाले, दोन वर्षांपूर्वी मी भाजपासोबत समझोता केला असता, तर मला अटक नसती झाली. पण दोन वर्षांपूर्वीच काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार पडले असते. मी शरद पवारांच्या उपस्थितीत हे विधान वर्धातील सभेत केले होते, माझ्याकडे जो प्रस्ताव आला होता त्याने मला अटक झाली नसती, पण सरकार पडले असते, याचा अर्थ तुम्ही समजून जा असं त्यांनी म्हटलेलं आहे.
Advertisement