शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील जाधव वाडी तळई गार्डन शेजारील असलेल्या रस्त्यावर कचराकुंड्या मुळे येथील रहिवासी नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला होता. डेंगू मलेरिया सारख्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. या सर्व परिस्थिती मुळे नागरिकांना या कचराकुंडी मुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विशाल आहेर यांनी सदरील कचरा कुंड्या इतरत्र हलविण्यासाठी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून या परिसरातील कचराकुंड्या हटविण्यात आले आहेत.
तळई गार्डन समोरील मुख्य रस्त्याच्या कडेला परिसराचा कचरा टाकला जात होता. मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तसेच परिसरातील घरे असलेल्या नागरिकांना दुर्गंधी तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने त्रास होत होता. पाच ते सहा कचराकुंड्या आणि सांडलेल्या कचऱ्यावर सुमारे शंभर ते दीडशे कुत्री रात्रीच्या वेळी येत होत्या. परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत होती. त्यामुळे हा कचरा कुंड्या ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही अशा ठिकाणी स्थलांतरित करावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल आहेर यांनी प्रशासनाकडे केली होती.
या मागणीत विशाल आहेर यांनी असे म्हटले होते की, जाधव वाडी परिसरातील कचरा गोळा करून तळई गार्डन समोरील रस्त्याच्या कडेला टाकला जातो. पाच ते सहा कचराकुंड्या आहेत, त्या कुंड्या ओसंडून वाहत असतात. रस्त्याच्या कडेला असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना वाहनचालकांना दुर्गंधीचा तसेच कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बाजूला लागूनच अवैधरित्या दारूची विक्री केली जाते. रात्रीच्या वेळी महिलांना ये-जा करणे अवघड जाते. त्यामुळे आरोग्य विभागाने हा कचरा लोकवस्ती नसलेल्या परिसरात स्थलांतरित करावा.त्यांच्या या मागणीला यश आले असून कचऱ्याची कुंडी प्रशासनाकडून त्या ठिकाणाहून हलविण्यात आली आहे.