*मिरा भाईंदर आयुक्त महापौर यांच्यावर गुन्हे दाखल करा* – : *बाबा कांबळे* .
★ *हातगाडी तोडलेल्या घटनास्थळी तीव्र आंदोलनकरून पोलीस स्टेशन पर्यन्त मोर्चा काडण्यात आला. हातगाडी धारक अमीन मालविया हे सहभागी* ★
मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त महापौर यांनी गोरगरिबांची हातगाडी हातोढ्याने तोडून टाकली . माणुसकीला काळींबा फासणारी क्रूर आणि जुलमी अत्याचार म्हणून या घटनेकडे बघितले जात आहे. महाराष्ट्रातील टपरी, पथारी, हातगाडी धारकांच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यात संताप निर्माण झाला आहे. मतासाठी गोरगरिबांच्या पाया पडणारे राज्यकर्ते सत्तेच्या धुंदीत मस्त आहेत. जनतेचे सेवक असणारे अधिकारी स्वतःला मालक समजत आहेत. गरिबांना कमी लेखण्याचा प्रयत्न होत आहे .मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर व हातगाडी धारकांवर अमानुष कारवाई करणारे सर्व कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अन्यथा अधिवेशन काळात मुंबई येथे मंत्र्यांना अडवून जाब विचारला जाईल असा इशारा या वेळी टपरी, पथारी, हातगाडी पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला.
मीरा भाईंदर येथील मीरारोड येथे मिरा भाईंदर महानगरपालिका अतिक्रमण पथकाने अमीन मालविया यांना मारहाण करून त्यांचे साहित्य फेकून देत मालाची नासधूस करून, हातोढ्याने हातगाडी तोडली. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आयुक्त महापौर यांच्यावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी टपरी, पथारी, हातगाडी पंचायत,कष्टकरी जनता आघाडी वतीने घटनास्थळा पासून पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढण्यात आला.
*कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतूत्वा खाली झालेल्या या आंदोलनात,कष्टकरी जनता महिला आघाडी अध्यक्षा अनिताताई सावळे, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या योगिनी पगारे,गटाई कामगारांचे नेते बळीराम तावरे, भीमराव कांबळे ,टपरी, पथारी, हातगाडी पंचायत सचिव प्रल्हादभाऊ कांबळे पुणे जिल्हाध्यक्ष मल्हारभाऊ काळे,रिक्षा संघटना नेते रंजित चांदणे , विजय खेतले ,मधुसूदन राणे , विजय ढगारे, आशिष देशपांडे , सहदेव तांबे , शिवा कांबळे, सुलतान शेख, विनायक गायकवाड ,सचिन माने, विशाल जाधव , आदी उपस्थित होते.*
टपरी ,पथारी, हातगाडी धारकांसाठी राज्य व केंद्र सरकारने कायदा केला असून मा. सर्वोच्च न्यायालयाने याबाबतीत हातगाडी धारकांची बाजू घेत त्यांना संरक्षण दिले आहे असे असतानाही ही कारवाई करण्यात आली हि अत्यंत चुकीची व बेकायदेशीर कारवाई असून मा. सर्वोच्च न्यायालय आदेशाचा भंग देखील झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाची कॉफी प्रत व निवेदन देऊन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून कारवाई न झाल्यास आम्ही गप्प बसणार न्याय मिळेपर्यंत आम्ही हातगाडी, टपरी, धारकांना सोबत आहोत असे या वेळी बाबा कांबळे म्हणाले .