शबनम न्युज / पिंपरी
पिंपळे गुरव येथील एकाने फ्लॅटची बनावट कागदपत्रे, पेमेंट दिलेले बनावट पावत्या बनावट सही स्टॅम्प तयार करून व खोट्या सही करून फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच याबाबत विचारणा केली असता फ्लॅटधारकला व त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सांगवी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रार अर्जात बांधकाम व्यावसायिक अरुण पवार यांनी म्हटले आहे, पिंपळे गुरव येथील सचिन कवडे यांनी माझे व्यवसायिक भागीदार जीवन जाधव यांना सावकारी कर्जातून काही रक्कम दिलेली आहे. या व्यवहाराचा आणि माझा काही संबंध नाही. तरीही सचिन कवडे यांनी आमच्या विरुद्ध खोटी कागदपत्रे व बनावट सह्या करून पुणे येथील मे, दिवाणी न्यायाधिष साहेब वरिष्ठ स्तर यांचे शिवाजीनगर न्यायालयात पुणे स्पेशल दिवाणी दावा क्रमांक 2268 तक्रार दाखल केलेली आहे. यावर आम्ही वकिलामार्फत आमची बाजू स्पष्ट केली आहे. माझा न्यायदेवतवर विश्वास आहे. जे सत्य आहे ते न्यायालयात समोर येईल, न्याय प्रविष्ट दिवाणी खटला चालू आहे. प्रत्येकाला लोकशाही, संविधानाने सर्वाँना अधिकार दिलेले आहेत.
कायद्याने त्याचे जे काही म्हणणे असेल, त्याने न्यायालयात मांडावे. ज्याचे सत्य आहे त्याला न्याय मिळेल. सचिन कवडे हा गुंड प्रवृत्तीचा आहे. मोठी सावकारी करतो, दमदाटी करतो व्याजाने पैसे देतो, त्याच्या बऱ्याच दूधडेरी ही आहेत, म्हणूनच अशा माध्यमातून सावकारी उभी केली आहे, अशी त्याची वर्तणूक आहे. सचिन कवडे म्हणतो, की मी गाववाला आहे, तुला माहिती नाही माझ्या पाठीमागे कोण कोण आणि किती मोठे हस्ती उभे आहेत, तू पोट भरायला आला आहेस, आम्ही गाववाला आहोत माझ्या नादी लागला तर तुला जीवे मारून टाकेल आणि पोलिसात तक्रार दिली, तर तुझे पूर्ण कुटुंबच संपऊन टाकेल, माझा नाद करू नको अशी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. वाकड येथील फ्लॅट दिला नाही, तर मला व माझ्या कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी देत अंगावर धावून आल्याचे अरुण पवार यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. याबाबतचा तक्रार अर्ज पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री (पुणे जिल्हा पालकमंत्री), सांगवी पोलीस ठाणे यामध्ये दाखल केला आहे.
पोलिसांनी त्वरित कारवाई न केल्यास माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तरी सचिन कवडे याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अरुण पवार यांनी केली आहे.