पुणे प्रतिनिधी ::: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र साहित्य प्रकाशित करण्याकरता प्रशासनाने प्रशासनाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती सुरुवातीपासूनच अडथळ्याची शर्यत पार करत आहे,
नव्याने स्थापन झालेल्या समितीचे अनेक महिने उलटून गेले तरी अद्याप कुठलीही बैठक नाही ,तसेच नियुक्त सदस्यांना साधे ओळखपत्र देण्याचे काम सुद्धा शिक्षण विभागाने केलेले नाही हे म्हणजे दुर्दैव म्हणावे लागेल,
फडणवीस सरकारच्या काळात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी साठे यांचे साहित्य प्रकाशित करून ते शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले होते.
त्यावेळी चरित्र प्रकाशन साधने समितीची घोषणा केली होती, तत्कालीन उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी सुरुवातीच्या काळात समितीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले होते,
त्यानंतर नव्याने आलेल्या महाविकास आघाडीचे सरकार आले व त्यांनी या समिती बरखास्त करून नव्याने शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्ष दाते 17 जणांची जम्बो समिती स्थापन करण्यात आली मात्र या समितीला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही, अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीची बैठक घेण्यास राज्य सरकार नकारात्मक भूमिकेत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली आहे..