शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथील तलावाच्या सिमाभिंतीची दुरुस्ती करावी व वारंवार होणाऱ्या दुर्घटना थांबवाव्यात या मागणीचे निवेदन भाजप नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले आहे की भोसरी येथील सद्गुरू नगर चक्रपाणी वसाहत लगतच्या सीमा भिंतीची पडझड झाली आहे सीमा भिंतीच्या आतील तलावात लहान मुले, तरुण पोहण्या साठी जातात तलावातील पाण्याची पातळी जास्त असते त्यामध्ये गाळ साचल्याने लहान मुलांचे पाण्यात बुडून मृत्यू होण्या च्या घटना वाढल्या आहेत मागील 27 सप्टेंबर रोजी या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. केवळ सीमाभिंत व्यवस्थित नसल्याने असे प्रकार वारंवार घडताना दिसत आहे.
अनेक लहान मुलांवर पाण्यात बुडण्याचे प्रसंग आल्याने त्यांना वाचविण्यासाठी आसपास कोणीही नसते त्यामुळे सीमा भिंतीची दुरुस्ती करण्याची येथील नागरिकांची मागणी आहे तसेच या सीमा भिंती लगतच्या परिसरात पाल, झोपडी टाकून लोक राहतात हे लोक व्यवसायानिमित्त बाहेर गेल्यानंतर लहान मुले सीमा भिंतीच्या आतील तलावाकडे पोहोण्यासाठी जाताना दिसतात, सीमा भिंतीच्या आत मध्ये जनावरे चरण्यासाठी व पाणी पाजण्यासाठी नेताना दिसतात ,जनावरां सोबत लहान मुले असल्याचे दिसते ,लहान मुलांना पोहताना तलावातील पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहेत,
सद्गुरू नगर व चक्रपाणी वसाहत येथे राहणारे बहुतांश कुटुंब हे हातावरील पोट भरणारे कुटुंब आहेत या कुटुंबातील लहान मुले घरीच असतात सध्या शाळाही बंद असल्याने या कुटुंबातील व्यक्ती लहान मुलांना घरात सोडून जातात आई वडील नसल्याने लहान मुले सहजरित्या तलावाकडे जात आहेत याबाबत गांभीर्याने विचार करण्यात यावा व तातडीने या तलावाच्या सीमा भिंतीची दुरुस्ती करावी अशी मागणी नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे