शबनम न्यूज
पिपंरीत गणेश वाळुंजकर यांनी आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप केले
पिंपरी (दि. 5 ऑक्टोबर 2021) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडिया संकल्पनेतून सर्व सामान्य नागरिकांना थेट लाभ मिळेल अशा शेकडो योजना कार्यान्वित केल्या आहेत. यामध्ये ‘आयुष्यमान भारत योजना’ हि नागरिकांना संकटाच्या काळात वैद्यकीय उपचारावेळी थेट पाच लाख रुपयांची कॅशलेस सुविधा देणारी महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेचा लाभ सर्व सामान्यांना मिळवून देण्यासाठी भाजपाचे अनेक कार्यकर्ते काम करीत आहेत. यामध्ये भाजपाच्या पक्ष संघटनेत सक्रियपणे काम करणारा नम्र स्वभावाचा गणेश वाळुंजकर एक सुस्वभावी कार्यकर्ता आहे. याचा इतर कार्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केले.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त भाजपाचे शहर पदाधिकारी गणेश वाळुंजकर आणि तुळजा भवानी बचत गटाच्या अध्यक्षा अनिता वाळुंजकर यांनी ‘सेवा सर्मपण सप्ताह’ अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमित गोरखे बोलत होते. शनिवारी (दि. 2 ऑक्टोबर) पिपंरी गावात पावर हाऊस चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात यावेळी भाजपा शहर उपाध्यक्ष तात्या जवळकर, भाजपा शहर सरचिटणीस देवदत्त लांडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कमल मलकानी, प्रा. गणेश ढाकणे, आयोजक गणेश वाळुंजकर, अनिता वाळुंजकर तसेच शारदा मुंढे, अशोक पंडीत, नेहूल कुदळे, आनंदा कुदळे, सलीम शेख, राजू लोखंडे, पुंडलीक सैंदाणे, गणेश शिंदे, गणेश लंगोटे, निती अमृतकर, जयेश चौधरी, संतोष शिंदे, मुकेश दळवी, गणेश वाणी, नामदेव वाघेरे, गिरीष गव्हाणे, विठ्ठल वाघेरे, रविंद्र फुलपगारे, संदिप महाले, जितेंद्र चित्ते, किशोर पवार आदी उपस्थित होते. ‘सेवा सर्मपण सप्ताह’ अंतर्गत सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी अमित गोरखे व उपस्थितांच्या हस्ते नोंदणी केलेल्या नागरिकांना ‘आयुष्यमान भारत योजना’ आणि ‘ई श्रम कार्ड’ चे वाटप करण्यात आले. आयोजक गणेश वाळुंजकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सामान्य नागरिकांना प्रत्यक्ष मदत करणा-या अनेक योजना सुरु आहेत. अपघात समयी अथवा तातडीच्या वैद्यकीय उपचारांवेळी नागरिकांकडे पैसे नसतात. परंतू जर आयुष्यमान भारत योजनेत नोंदणी केली असेल तर अशा प्रसंगी पाच लाख रुपयांची कॅशलेस सुविधा मिळते. या योजनेतून देशातील सर्व सरकारी, खासगी तसेच धर्मादाय रुग्णालयात उपचार घेता येतील. या ई श्रम कार्ड साठी पिंपरी गाव व परिसरातील 1250 नागरिकांनी आणि आयुष्यमान भारत योजनेसाठी 3000 नागरिकांनी नोंदणी केली आहे. या सर्वांना कार्ड वाटप करण्यात येणार आहे.
स्वागत प्रा. गणेश ढाकणे, सुत्रसंचालन हनुमंत घुगे आणि आभार गौरव वाळुंजकर यांनी मानले.