शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
इंद्रायणी नगर मधील भाजी मंडई मध्ये स्थानिक भाजी विक्रेत्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका नम्रता योगेश लोंढे यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील इंद्रायणी नगर से. नं. 2 मध्ये प्राधिकरण वतीने बांधण्यात आलेली भाजीमंडई आपण ताब्यात घेऊन भूमी-जिंदगी विभागाच्या वतीने त्यांचे गाळे वाटप करण्यात आले. परंतु त्यामध्ये स्थानिक भाजी विक्रेत्यांना डावलले गेले आहे. या यादीतील मोजके लोक स्थानिक असून बरेचसे बाहेर गावातील आहेत. यामध्ये आमच्या भागातील जुने भाजीविक्रेते यादीमध्ये आलेले नाहीत. आपला उद्देश पद व रस्ते मोकळे करणे आहे. परंतु या भाजी विक्रेत्यांना जर गाळे मिळाले नाही तर ते पुन्हा रस्त्यावर बसतील व पुन्हा रस्ते गिळंकृत होतील. म्हणून माझ्या प्रभागातील स्थानिक भाजी विक्रेत्यांना प्रथम प्राधान्य द्यावे, असेही नगरसेविका नम्रता लोंढे यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.