शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यामधून रॉकेल व डिझेलचा वास येत आहे. त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करा, अशी मागणी संस्थापक /अध्यक्ष, विठ्ठल प्रतिष्ठान निखिल उमाकांत दळवी यांनी मा.कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग अ क्षेत्रिय कार्यालय निगड़ी पुणे – ४४ यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात त्यांनी म्हटले आहे की , प्रभाग क्रमांक १४ मधील दयानेश वर कॉलनी भंगारवाड़ी येथे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या मधुन येणाऱ्या पाण्याला रोकेल व डिजेल चा वास येत आहे. दिनांक १९/१०/२०२१ व २१/१०/२०२१ या दोन्ही दिवशी आलेल्या पाण्या मधुन रोकेल व डिजेल चा वास येत असल्या ने स्थानिक नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही नागरिकांच्या घरा मधे गडुल व घान पाणी येत आहे हे पाणी पिल्या ने नागरिकांच्या आरोग्यस धोका निर्माण होऊ शकतो, अशा स्थानिक नागरिकांच्या तक्रारारी आहेत तरी या विषया कड़े लक्ष देऊन लवकरत लवकर उपाय योजना करा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. या साठी नागरिकांच्या वतीने विठ्ठल प्रतिष्ठाण वतीने पाणी पुरवठा विभागाला निवेदन देत आहे . असे दिलेल्या निवेदनात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे.