वारकरी संप्रदाय वतीने वतीने बाबा कांबळे यांचा जाहीर नागरी सत्कार
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.०३ डिसेंबर) :- बाबा कांबळे यांनी वयाची ४५ वर्षे पूर्ण केली आहेत. तर कष्टकरी संघटना स्थापनेची २० वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचा कष्टकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यांचा सन्मान हा उपेक्षित, शोषित व कष्टकऱ्यांचा सन्मान असल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले.
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरासमोरील समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा येथे बाबा कांबळे यांचा जाहीर नागरी सत्कार पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते पार पडला. या वेळी ते बोलत होते.
या वेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, आळंदी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वैजयंता अशोक उमरगीकर,माजी नगराध्यक्ष दिलीप भोसले पाटील, आळंदी नगरपालिका नगरसेवक प्रकाश कुराडे, ज्ञानेश्वर रायकर, समाज सुधारला समाज धर्मशाळा संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग आबनावे, संत रोहिदास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, हवेली पंचायत समिती माजी सभापती किसन गाडेकर, आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी व वारकरी, कष्टकरी कष्टकरी जनता उपस्थित होते.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले की, वाईट प्रवृत्तीचा नाश होण्याची प्रतिज्ञा पसायदानात आहे. मनुष्य वाईट नसतो. तर अंगातील काही गुण वाईट असतात. ते वाईट गुण काढून टाकणे गरजेचे आहे. माउलींनी देखील विठ्ठलाकडे हेच मागणे मागितले. दुष्कर्मे काढली तर नंतर सत्कर्म वाढत जाते. त्यानंतर जगातील सर्व जीव प्रेमळ होतील. अशीच अपेक्षा बाबा कांबळे यांच्या सोबतच्या लोकांकडून व्यक्त होत आहे. वारकरी आणि समाजवादी हे विरोधाभासी नसून सारखेच आहे. वारकऱ्यांचे उद्दीष्ठे घेऊनच पुढील वाटचाल आपण करणे गरजेचे आहे.