शबनम न्यूज : पुणे (दि.२८ डिसेंबर) :- पुण्याहुन साताऱ्याला जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना उडवले असून, यात ३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. उतारावर ट्रक मागे सरकल्याने पाठिमागून येणाऱ्या वाहनांना त्याची धडक बसल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. मंगळवार (दि.28) रोजी सकाळी 9 च्या सुमारास हा अपघात झाला.
डिझेल संपल्यामुळे एक ट्रक बंद पडला होता. त्यानंतर काही वेळाने ड्रायव्हरने डिझेल आणून ट्रक पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी ट्रकचा ब्रेक फेल झाले आणि हा कंटेनर ताशी 70 च्या वेगाने मागे गेला. मागे जाताना या ट्रकने दोन-तीन वाहनांना धडक दिली. यामध्ये काही दुचाकींचा देखील समावेश आहे. या ट्रक खाली चिरडला गेल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत.ज्या पहिल्या कारला या ट्रकने धडक दिली त्यामध्ये प्रवास करणारे दिल्लीवरून महाबळेश्वरला फिरण्यासाठी आणि नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी निघाली होती. तर, दुसऱ्या गाडीमध्ये नवीन लग्न झालेलं जोडपं देवाचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरला निघाले होते. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत. तिसऱ्या गाडी मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासी भोसरीहून कामाच्या निमित्ताने साताऱ्याकडे येण्यास निघाला होता.