शबनम न्यूज : मुंबई (दि.०५ जानेवारी) :- राज्यातील कृषी महाविद्यालये वगळता सर्व महाविद्यालयांचे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. या काळात ऑनलाईन वर्ग सुरु राहतील. तर सर्व विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होतील. अशी माहिती आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीउद्य सामंत यांनी आज दिली.
आज आम्ही प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेवून महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सामंत यांनी सांतिले.
वसतीगृह देखील बंद करण्याचे निर्देश
“सर्व विद्यापीठं, महाविद्यालयांशी निगडीक वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन आणि निश्चित कालावधी देऊन वसतीगृह देखील बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सर्व विद्यापीठांनी करावी. पण जे विद्यार्थी परदेशातून आपल्या राज्यात आले आहेत, त्यांची वसतीगृहाची सुविधा मात्र बंद करण्यात येऊ नये”, असं उदय सामंत म्हणाले.