शबनम न्यूज : वृत्तसंस्था | ०१ फेब्रुवारी
देशासाठी महत्त्वाचा मानला जाणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले.
फडणवीस ट्विटमध्ये म्हणाले की, खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत आणि बलशाली भारत तयार करणाऱ्या तसेच भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांचे खूप खूप आभार! असे ट्विट फडणवीस यांनी केले.
भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे.
सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान मा. @narendramodi जी, @nsitharaman जी यांचे खूप खूप आभार!#AatmanirbharBharatKaBudget— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 1, 2022
Advertisement