वृत्तसंस्था
शबनम न्यूज : पुणे (दि.२९ मार्च) :- पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा एप्रिलअखेर होणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षण विभागाने दिली आहे. तर उन्हाळी सुट्टी रद्द करण्यात आली नसून त्या सुट्ट्या मे आणि जूनमध्ये असणार आहे. ज्या शाळांचा अभ्यासक्रम पुर्ण झाला नाही त्याच शाळा सुरू राहतील, यंदा वार्षिक परीक्षा एप्रिलअखेर होणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. देशासह राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाच प्रादुर्भाव कमी झाला असून, कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील घट झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून एप्रिलअखेरपर्यंत शाळा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की विद्यार्थ्यांना रविवारी दिलेली साप्ताहिक सुट्टी आणि शनिवारी अर्धी सुट्टी देखील रद्द करण्यात आली आहे. रविवारी ज्या विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थित राहण्याची इच्छा असेल ते विद्यार्थी वर्गात बसू शकतात असे सांगण्यात आले आहे.
उन्हाळी सुट्टी वाढवली
उन्हाचा तडाखा वाढल्याने विद्यार्थ्यांना गावी जाण्याची इच्छा होऊ लागली. मात्र, एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू राहणार असल्याने विद्यार्थ्यांना मे आणि जूनमध्ये उन्हाळ्याची सुट्टी मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शाळा सुरू ठेवण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले होते. अहवालानुसार, विद्यार्थ्यांचे वर्ग एप्रिल अखेरपर्यंत 100% उपस्थितीसह सुरू राहतील. साधारणत: मार्च महिन्यात शाळा सकाळच्या सत्रातच विद्यार्थ्यांनी भरून जाते. पण कोरोनाने आधीच विद्यार्थ्यांचे खूप नुकसान केले आहे. कोरोनाची प्रकरणे कमी झाल्याने एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे शिक्षण विभागाने यावेळी सांगितले. या दरम्यान, शाळेतील विद्यार्थ्यांच्या 100% उपस्थितीसह, शनिवार आणि रविवारी पूर्णवेळ शाळा सुरू ठेवण्याचे स्वातंत्र्य असेल. ज्या विद्यार्थ्यांना रविवारी शाळेत यायचे आहे ते रविवारीही शाळेत येऊ शकतात, असे आदेशात म्हटले आहे.