स्वच्छ ऊर्जेकरीता त्वरित अवलंबनावर लक्ष केंद्रित करणारा भारतातील सर्वात मोठा आणि एकमेव पवन ऊर्जा व्यापार मेळावा आणि परिषद
• एकूण-शून्य उत्सर्जनाची राष्ट्रीय वचनबद्धता साध्य करण्यासाठी पवन टर्बाइनची उत्पादन क्षमता वाढवणे, स्वदेशीकरणाचा जास्तीत जास्त वापर, सुलभ वित्तपुरवठा यंत्रणा आणि विविध उद्योगांचा सहयोग यावर विशेष भर
• विशेषकरून ग्रामीण भागात 2 दशलक्ष रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशाने, पवन ऊर्जेचा वाढता वापर
शबनम न्यूज : पुणे (दि.०१ एप्रिल) :- स्वच्छ उर्जेच्या राष्ट्रीय संकल्पाच्या अनुषंगाने, विचारपूर्वक आणि सुलभरित्या त्वरित अवलंबन करून पवन ऊर्जा इको-सिस्टीम सुधारण्यासाठी, आगामी भव्य पवन ऊर्जा व्यापार मेळावा आणि परिषद – विंडर्जी इंडिया 2022 सज्ज आहे.
स्वच्छ ऊर्जेचा प्रमुख स्तंभ, अशा पवन ऊर्जेचा त्वरित अवलंब करण्याच्या, राष्ट्रीय वचनबद्धतेची पूर्तता करण्यावर लक्ष केंद्रित करणारा, तीन दिवसीय भव्य पवनऊर्जा कार्यक्रम, दिनांक 27 एप्रिल ते 29 एप्रिल 2022 या कालावधीत, नवी दिल्ली येथील प्रगती मैदान, येथे आयोजित केला जाईल.
व्यापार मेळाव्याच्या बरोबरीने होणार्या उच्चस्तरीय परिषदेमध्ये, भारत सरकारचे ऊर्जा आणि नवीन तसेच अक्षय ऊर्जा खात्याचे कॅबिनेट मंत्री – माननीय आर. के. सिंग, भारत सरकारचे ऊर्जा आणि नवीन तसेच अक्षय ऊर्जा, रसायने आणि खते या खात्यांचे राज्य मंत्री – भगवंत खुबा, डेन्मार्कचे राजदूत – महामहिम फ्रेडी स्वान, यांच्यासह इतर मान्यवर आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज यांचा समावेश असेल. या प्रदर्शनामध्ये 150 हून अधिक कंपन्यांची उत्पादने, कार्यपद्धती आणि तंत्रज्ञानाचे कौशल्य याचा उपस्थितांना लाभ होऊ शकतो. 3 दिवसांच्या प्रदर्शनासह 2 दिवसांचे गहन विचारमंथन, यामुळे सहभागींसाठी अतुलनीय नेटवर्किंग आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सीओपी२६ (नोव्हेंबर 2021) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणे आणि 2070 पर्यंत एकूण-शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य गाठणे, या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी पाच प्रमुख लक्ष्यांसाठी वचनबद्धतेची घोषणा केली आहे. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे: (1) 2030 पर्यंत देशाची गैर-जीवाश्म ऊर्जा क्षमता 500 जीडब्ल्यूपर्यंत वाढवणे (2) 2030 पर्यंत देशाची 50 टक्के ऊर्जा आवश्यकता अक्षय ऊर्जेतून येणार आहे (3) आत्तापासून 2030 पर्यंत, एकूण अनुमानित कार्बन उत्सर्जन एक अब्ज टनांनी कमी करणे. (4) 2030 पर्यंत, भारत आपल्या अर्थव्यवस्थेची कार्बन तीव्रता 45 टक्क्यांहून अधिक कमी करेल. (5) 2070 पर्यंत, भारत एकूण-शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करेल.
वरील उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये पवन ऊर्जा महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि क्षमता वाढ, उत्पादन क्षमता आणि इतर क्षेत्रांमध्ये पवन ऊर्जेने अगोदरच प्रभावी प्रगती केली आहे. सध्या, देशातील एकूण स्थापित उर्जा क्षमतेपैकी 27% ही अक्षय ऊर्जेतून येते, त्यापैकी 37.73% योगदान हे पवन ऊर्जेचे (40.13 GW) आहे. भारताने 2022 पर्यंत 175 जीडब्ल्यू अक्षय ऊर्जा क्षमतेचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यामध्ये 100 जीडब्ल्यू सौर उर्जा, 60 जीडब्ल्यू पवन उर्जा, आणि उर्वरित ऊर्जा ही जैव उर्जा आणि लघु जलविद्युत याद्वारे असेल.
भारतीय पवन उर्जा उद्योगाची, पवन टर्बाइनची, 10,000 मेगावॅट इतकी प्रभावी वार्षिक उत्पादन क्षमता आहे, जी योग्य धोरण आणि आर्थिक सहाय्याने नजीकच्या भविष्यात 15,000 मेगावॅटपर्यंत वाढवली जाऊ शकते. भारतीय पवन ऊर्जा क्षेत्राने 80% स्वदेशीकरण देखील साध्य केले आहे, जे “मेक इन इंडिया” उपक्रमाच्या तत्त्वानुसार असून, जीडीपी वाढीमधील योगदानाव्यतिरिक्त ज्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विशेष फायदेशीर प्रभाव आहे कारण विशेषतः ग्रामीण भागात पवन ऊर्जेमुळे अतिरिक्त 2 दशलक्ष रोजगार निर्माण होतील जे महत्त्वाचे आहे.
पवन ऊर्जा क्षेत्रासाठीचा एकमात्र व्यापक व्यापार मेळावा – विंडर्जी इंडिया 2022, इंडियन विंड टर्बाइन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयडब्ल्यूटीएमए) आणि पीडीए ट्रेड फेअर्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे आयोजित केला जात आहे.
या सर्वात भव्य पवन ऊर्जा कार्यक्रमाला, भारत सरकारचे नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय, भारतीय अक्षय ऊर्जा विकास एजन्सी (आयआरइडीए), इंडिया एनर्जी स्टोरेज अलायन्स (आयइएसए), इंडियन विंड पॉवर असोसिएशन (आयडब्ल्यूपीए), भारतीय स्वतंत्र ऊर्जा उत्पादक संघटना (आयपीपीएआय), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विंड एनर्जी (एनआयडब्ल्यूइ), सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसइसीआय), स्किल कौन्सिल फॉर ग्रीन जॉब्स (एससीजीजे), वर्ल्ड विंड एनर्जी असोसिएशन (डब्ल्यूडब्ल्यूइए), नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन (एनएसआयसी), अक्षय ऊर्जा असोसिएशन (आरइएआर) आणि दी एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टीइआरआय), भागीदार देश – डेन्मार्कचा दूतावास यांचे समर्थन लाभले आहे.