वृत्तसंस्था
शबनम न्यूज : मुंबई (दि.१९ एप्रिल) :- आयपीएलमध्ये कोरोनाच्या एन्ट्रीनंतर मंगळवारी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील उद्या (दि. २०) बुधवारी पुण्यात सामना होणार नाही. बंद वातावरणात लांब पल्ल्याच्या बस प्रवासादरम्यान कोणतीही अनोळखी घटना घडू नये यासाठी. आता हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
NEWS 🚨: CCI – Brabourne to host Delhi Capitals vs. Punjab Kings on April 20th.
AdvertisementDetails – https://t.co/8zPLVsS7qJ #TATAIPL pic.twitter.com/yGqEaHfycT
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2022
सध्या दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ क्वारंटाईनमध्ये आहे. दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श आणि इतर तीन ससस्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. टीमचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट आणि डॉक्टर साळवी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बुधवारी (दि. २०) होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यावर धोक्याचे सावट निर्माण झाले. हा सामना पूर्वी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर होणार होता, मात्र आता कोरोना संसर्गामुळे हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार , 16 एप्रिलपासून, संपूर्ण दिल्ली कॅपिटल्सची तुकडी दैनंदिन RT-PCR चाचणी प्रक्रियेअंतर्गत ठेवण्यात आली आहे. मंगळवारी 19 एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता दिल्लीच्या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी झाली. घेण्यात आलेल्या RT-PCR चाचण्यांच्या चौथ्या फेरीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दिल्ली कॅपिटल्सची टीम 20 एप्रिल रोजी सकाळी RT-PCR चाचणीची दुसरी फेरी घेईल. दरम्यान, खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासकीय समितीने सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आहे.