शबनम न्युज | पुणे
सध्या बंगळुरू येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2021 (KIUG) मध्ये 10 मीटर एअर रायफल स्पर्धे साठी निवड झालेल्या गजानन शहादेव खंडागळे याने या स्पर्धेत ३ पदके मिळवली . २०२० मध्ये, एक्सलन्स शूटिंग स्पोर्ट्स क्लब मधून गजानन चा १० मीटर रायफल शूटिंग या खेळाचा प्रवास सुरु झाला आणि तो ह्या शिखरावर पोहचला
राज्य स्तरीय स्पर्धा ते खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स हा प्रवास गजानन साठी खुप कठीण होता.कारण त्याचा घरची परिस्थिती आर्थिक दृश्य नाजूक होती. त्यामुळे त्याने 10 मीटर एअर रायफलवर जाण्याचा निर्णय घेतला, कारण त्यासाठी कमी उपकरणे लागतात आणि ते परवडणे तुलनेने सोपे होते . “गजानन च्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी त्याच्या पालकांनी काही नातेवाईकांकडून पैसे ही उधार घेतले. तसेच ह्या प्रवासात गजानन ला प्रशिक्षक सौरभ साळवणे व संवेदना खांबे ह्यांचा ही वेळोवेळो खूप आधार मिळत गेला.
२०२० मध्ये ,मी क्लब मध्ये प्रवेश घेतला आणि लॉकडाउन लागले. एकहि दिवस वाया न घालवता सौरभ सरांच्या मदतीने डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली लॉकडाउन मध्ये सुद्धा मी सराव केला व त्याच सरावाचा मला खूप फायदा झाला .पूर्व-राष्ट्रस्तरीय स्पर्धेमध्ये मी ४०० पैकी ३९७ गुण मिळवून विक्रम नोंदविल्यानंतर माझा पालकांनी मला रायफल घेऊन दिली. राष्ट्रस्तरीय स्पर्धेमध्ये कास्य पदक मिळवल्या नंतर सौरभ सरानी मला शूटिंग रेंज वरील सराव , प्रशिक्षण , इलेक्ट्रॉनिक टार्गेट , स्कॅट ह्या सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या आणि स्पर्धे साठी लागणार खर्च , गोळ्या , शूटिंग किट ह्या गोष्टी मला उधार दिल्या त्यामुळे माझा व पालकांचा आर्थिक तणाव कमी झाला आणि मी खेळावरती जास्त लक्ष केंद्रित करू शकलो आणि भारतीय संघ निवड चाचणी व अखिल भारतीय विश्वविद्यालय खेळ ह्या स्पर्धेंमध्ये पदक मिळवून मी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स पर्यंत पोहचलो आणि सुवर्ण , रौप्य व कांस्य अशी तीनही पदके मी कमावली व या यशाचे श्रेय मी माझे पालक, क्लब आणि माझे प्रशिक्षक सौरभ सर व संवेदना मॅडम यांना देऊ इच्छितो , असे गजानन ने सांगितले.
“ऑलिम्पिकमध्ये जाण्याचे माझे ध्येय” – नेमबाज गजानन शहादेव खंडागळे
खेळो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2021 मधील कांस्यपदक विजेते गजानन शहादेव खंडागळे यां ना त्यांच्या कुटुंबाकडून व त्याच्या प्रशिक्षकांकडून बिनशर्त पाठिंबा मिळाल्याने त्यांचे लक्ष ऑलिम्पिकवर केंद्रित झाले आहे. या 22 वर्षीय तरुणाला मोठ्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे. त्याने स्पष्ट केले