शबनम न्युज | पिंपरी
महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग निवृत्ती गायकवाड यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्यात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना दिलीप वळसे पाटील यांनी आर्यन खान प्रकरणाबाबतही भाष्य केले.“न्यायालयाचा निर्णय आला असून आर्यन खानवर जे आरोप केले गेले त्यामध्ये काही तथ्य आढळले नाही. केंद्रानेसुद्धा याची दखल घेतली असून संबधितांविरुद्ध कारवाईची सूचना दिली आहे.
अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनसह सहा जणांविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे स्पष्ट करीत केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) शुक्रवारी त्यांच्यावरील आरोप रद्द केले. गेल्या काही वर्षांत हिंदी चित्रसृष्टीतील तारांकितांपासून ते सहकलाकारांविरोधात ‘एनसीबी’ने केलेल्या अनेक कारवाया फोल ठरल्या, त्यात आर्यन खान निमित्ताने आणखी एकाची भर पडली आहे. त्यानंतर आताक्रूझ ड्रग प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्याचा आदेश केंद्र सरकारने केंद्रीय अर्थ मंत्रालयाला दिला असल्याचे समजते. त्यामुळे ‘एनसीबी’तून यापूर्वीच उचलबांगडी झालेल्या वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.