शबनम न्युज | मुंबई
राज्याच्या विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजपा चमत्कार घडवणार याबाबत प्रचंड उत्कंठा लागली आहे. दरम्यान पुण्याच्या आमदार मुक्ता टिळक या कर्करोगाशी झुंज देत असतानाही मतदानासाठी मुंबईत दाखल झाल्या आणि त्यांनी पक्षनिष्ठा सर्वश्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले. त्या जेव्हा मतदानासाठी पोहोचल्या त्यावेळी सर्व आमदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्यांचे स्वागत केले.
यावेळी, “प्रतिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा महत्वाची!” असे विधान करत त्यांनी साऱ्यांचीच मने जिंकली. त्या जेव्हा मतदानासाठी पोहोचल्या त्यावेळी सर्व आमदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्यांचे स्वागत केले.दरम्यान, १० जूनला राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील मुक्ता टिळक या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी देखील त्यांच्या लढाऊवृत्तीचे कौतुक करण्यात आले होते.