शबनम न्युज | मुंबई
राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. आता मतमोजणी सुरु असताना राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद झाले आहे. मतपत्रिकेच्या छाननीत एक मत बाद झाल्याची माहिती मिळाली आहे.
तसेच भाजपचा हि एक मत बाद ठरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक मत बाद झाल्याचा मोठा फायदा महाविकास आघाडीला होणार असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच यावेळी आपलाच पक्षाचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास सर्व पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. यामध्ये भविष्यवाणी म्हणून सांगतोय, भाजपाचे ४ आणि मविआचे ६ विजयी होणार, असे वक्तव्य आमदार मंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. तसेच काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले कि, आम्हाला विजयाची खात्री, नाना पटोले पळ काढणारा माणूस नाही. असे विधान नाना पटोले यांनी केले. तर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असे वक्त्यव्य राज्याचे महसूल मंत्री, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.