शबनम न्युज | मुंबई
राज्याचे राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. आता मतमोजणी सुरु असताना राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद झाले आहे. तसेच भाजपच्या उमा खापरे यांचे मत देखील बाद करण्यात आले. रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांचे मत बाद केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने यावर आक्षेप घेतला असून, भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करत धाव घेतली आहे. याकारणाने मतमोजणी पुन्हा थांबण्यात आली आहे.
Advertisement