शबनम न्युज | मुंबई
एकीकडे विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी महाविकासआघाडीची अनेक मतं फुटली आणि भाजपाने त्यांच्या सर्व पाच जागांवर विजय मिळवला. दुसरीकडे निकालानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर गेले. त्यांच्यासोबत काही समर्थक आमदार असल्याने महाविकासआघाडी सरकार धोक्यात असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. यानंतर आता शिंदे यांनी पक्षाविरोधात कथित बंड पुकारल्यानंतर पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदावरुन बडतर्फ केलं आहे. विधानसभेच्या गटनेता पदावरुन एकनाथ शिंदेंना हटवण्यात आलं आहे.
या कारवाईमुळे शिंदे आता शिवसेनेमध्ये राहणार की नाही याबद्दलच्या चर्चांना पुन्हा नव्याने उधाण आलं आहे. आज सकाळपासून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे काही आमदार नॉट रीचेबल झाल्यामुळे राजकीय भूकंप होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे २० ते ३५ खासदार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंनीशिवसेना सोडून वेगळा गट स्थापन केला तर त्यांच्यासमोर काय पर्याय असतील, याच्या काही शक्यता समोर आल्या आहे.