शबनम न्युज | मुंबई
राज्यातील सत्ता संघर्षात आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरू शकतो. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच उद्या बहुमत चाचणी होणार की नाही, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आता सुप्रीम कोर्ट रात्री ९ वाजता निकाल देणार आहे.
जर न्याय द्यायचा असेल, तर एका आठवड्यानं ही फ्लोअर टेस्टची चाचणी पुढे ढकलावी किंवा उपाध्यक्षांना वरील निर्बंध थोडे कमी करा, अशी सिंघवी यांनी मागणी केली आहे.
Advertisement