शबनम न्युज | मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदा राजीनामा दिला आहे. मला बहुमताचा खेळ खेळायचा नाही. ज्यांना शिवसेनाप्रमुखांनी आणि शिवसैनिकांनी मोठं केले. त्या शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवल्याने पुण्य मिळत असेल ते त्यांना मिळू द्या. हा आनंद कुणीही हिरावून घेऊ नये. मला मुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा अजिबात नव्हती. मला खुर्चीला चिटकून बसायचं नाही. मी मुख्यमंत्रिपदाचा त्याग करतोय, त्याचसोबत विधान परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देतोय अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून केली.
ते म्हणाले कि, मातोश्रीवर सामान्य शिवसैनिक येत होते, ज्यांना दिले ते नाराज आणि ज्यांना दिले नाही त्यांचे प्रेम होते, असे सांगत राज्यपालांनी दिलेल्या निर्देशावर एक प्रकारे तीव्र नाराजी व्यक्त केली. आता फ्लोअर टेस्ट होणार आहे. राज्यपालांनी जो आदेश दिलेला आहे, त्याचे पालन करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आपण लोकशाहीचा मान राखला, २४ तासांच्या आत फ्लोअर टेस्ट देण्यास सांगितले. त्या राज्यपालांना मी आठवण करून देऊ इच्छितो की, गेल्या दीड दोन वर्षांपासून विधान परिषद उमेदवारांची जी यादी दिलीय ती मंजूर करावी, आताही केली तरी चालेल, असा टोला खोचक उद्धव ठाकरे यांनी लगावला.